उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ च्या प्रवेशिकास मुदतवाढ… 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

234

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यास आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर संकेतस्थळावरुन विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात.तरी, प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.