शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंच,चंद्रपूरद्वारे पर्यावरण दिनी रंगली काव्यमैफिल… #वैश्विक पर्यावरणासाठी साहित्यिकांची लेखणीच ठरणार पर्वणी- कवी गोपाल शिरपूरकर…

386

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.जगात पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी शासन व विविध संस्था उपक्रमाद्वारे साजरा करीत असतो.’एक व्यक्ती,एक झाड’ यासाठी पर्यावरण दिनी काव्यातून जनजागृती करण्यासाठी शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंच,चंद्रपूरने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यमैफिल गूगल मिटद्वारा आयोजित केली होती.यात राज्यभरातून कवी/कवयित्री यांचा मोठया प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित पर्यावरणाचा समतोल सुरळीत राहण्यासाठी करावयाचे उपाय,रक्षण,विनाश होण्याची कारणे काव्यातून मांडले.
शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंचद्वारा आयोजित काव्यसम्मेलनाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक मा.गोपाल शिरपूरकर यांनी वैश्विक पर्यावरणासाठी साहित्यिकांची लेखणीच पर्वणी ठरण्याचा मनोदय व्यक्त केला तर कार्यक्रमाचे उदघाटक अहमदनगर जिल्ह्यातील कवी,लेखक,गझलकार मा.रज्जाक शेख (जीवन गौरव मासिक सहसंपादक) यांनी सुमधुर वाणीतून पर्यावरणाबाबत वास्तवतेची स्थिती काव्यातून मांडली.दुशांत निमकर अध्यक्ष,’शब्दांकूर फाऊंडेशन’ यांनी काव्यसम्मेलनाचे प्रास्ताविकेतून तरुणांनी समोर येऊन जनजागृती करण्याची जगाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.
राज्यभरातून विविध कवी/कवयित्री यांनी अभंग,मुक्तछंद,गझल यातून आपल्या रचना सादर केल्या.शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंच,चंद्रपूरचे मार्गदर्शक विजय वाटेकर,गणेश कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यकारिणी यांच्या संकल्पनेतून ही काव्यमैफिल उदयास आली.यामध्ये एकूण ४७ कवींनी सहभाग घेतला असून कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिल्हाध्यक्ष सुशांत मुनगंटीवार,नेतराम इंगळकर,ऋषिकेश तांडेकर,विघ्नेश्वर देशमुख,गणेश पिंपळशेंडे, शीतल कर्णेवार,अर्चना यदनूरवार,सूरज दहागावकर,राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख,प्रशांत खुसपुरे,राकेश शेंडे,तानाजी अल्लीवार,मधुकर दुफारे, नीरज आत्राम,सचिन चिमुरकर,योगेश धोडरे, यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हासचिव अतुल येरगुडे यांनी केले तर आभारप्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष संभाशिव गावंडे यांनी केले.