भूमिपुत्र ब्रिगेडने केले भूमिपुत्र शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत

391

मूल: तालुक्यातील फुलझरी गावातील शेतकरी रघुनाथजी मोहूर्ले याचे धान पीक औषध फवारणीमुळे जळाले, दिवाळीच्या समोर गरीब शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. वर्षभर केलेली मेहनत काही लोकांच्या चुकीमुळे क्षणार्धात मातीमोल होताना दिसली.
पण लालफितशाही चा कारभार लांबच लांब असल्यामुळे शेतकरी कोलमडल्यावर आधार देण्याचा सोडून कागदोपत्री कचाट्यात टाकून कधी न्याय मिळेल हे कृषी विभागातील महाभागांनाच माहीत.
रघुनाथजी यांना न्याय मिळेल तेव्हा मिळेल त्यासाठी तर शेवटपर्यंत भांडत राहूच पण कोलमडलेल्या शेतकऱ्यांला आधी आर्थिक विवेचनातून बाहेर काढणे आवश्यक असून त्यासाठी सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी व शेतकऱ्यांसाठी सतत आवाज उठवणाऱ्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेताची पाहणी केल. शेतकऱ्याना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन ह्या भूमिपुत्र शेतकरी पुत्र श्री रघुनाथजी मोहूर्ले यांना एक अल्पसा आधार मिळावा म्हणून आर्थिक मदत केले. आणि शासनाकडून नुकसान भरपाई व संबंधित कृषी केंद्राची चौकशी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर मदत केंद्र निर्माण करावे या मांगणीला घेऊन जिल्हाधिकारी यांना पत्र देणार आहोत असे वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
यावेळेस भूमिपुत्र ब्रिगेड चे कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.