पाऊसामुळे राळापेठ गावचा तालुक्याशी संपर्क तुटला; शैक्षणिक आणि शासकीय कामावर परिणाम

गावकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अन्यथा आंदोलन करण्याचा सरपंच राऊत यांचा इशारा

गोंडपिपरी:- अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रसह चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याच्या जवळील आष्टी नामांकित शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीवरील नवीन पुलियाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. आणि दुचाकी वाहने व कार, वगैरे अशी छोटी वाहने ये जा करीत आहेत.

खास करून जुना पूलियाच्या लेव्हलमध्येच राळापेठ गावाकडे जाणारा रस्तामार्ग होता. परंतु पावसाने जुनापूलाची पातळी व राळापेठ मार्गाची पातळी संपूर्ण पावसाने भरून गेल्याने ना गोंडपिंपरी प्रवास करता येत आहे! ना आष्टी प्रवास करता येत आहे !अशी परिस्थिती गावकऱ्यांची झाली आहे.

विशेष म्हणजे गावकरी कसेबसे इतर गावागावातून मार्ग शोधत स्वतःची शेती व तालुकास्तर गाठत आहेत. परंतु आष्टी या गावात कॉन्व्हेंट व इतर शासकीय शाळेत शिकणारे विद्यार्थी व गोंडपिपरी मार्गावरील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक दिवसापासून मार्ग बंद असल्यामुळे यांचे शिक्षण वाया जात आहे.

याकडे प्रशासनाने लक्षच देणे टाळले काय? असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत. ही समस्या तात्काळ मार्गी लागली नाही तर प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा सालेझरी(राळापेठ)ग्रामपंचायतीचे सरपंच राजू राऊत यांनी सोशल मीडिया द्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!