वाघाच्या हल्ल्यात तीन बकऱ्या ठार..

850

गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगांव येथील जवळच असलेल्या डोंगरीला लागुन असलेल्या शेतामध्ये काल सायंकाळी वाघाने हल्ला करुन तीन बकऱ्या ठार केल्या…
हि घटना आज सकाळी शेळ्या चारण्यासाठी सोडले असता शेरक्याला तीन बकऱ्या गायब आहे असे लक्षात आहे. तेव्हा त्याने ही घटना गावात सांगितली. त्यानंतर गावकऱ्याच्या मदतीने डोंगरीत जवळस असलेल्या शेतामध्ये जाऊन शोध घेतला असता हि घटना उघडकीस आली. जेव्हा गावकऱ्यांनी घटनास्थळी गेले तेव्हा वाघ बकरीला ठार करुन मास खात होता. हा सर्व प्रकार बघून गावकऱ्यांनी त्या वाघाला हाकलून लावले.
या बकऱ्या भारत राऊत,अंबादास दुधकोहर आणि संभाजी मडावी यांच्या मालकीच्या होत्या…